महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आणखी पाच गॅरंटींची अंमलबजावणी करणार

10:52 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचे आश्वासन

Advertisement

कारवार : गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आशीर्वाद दिलात त्याप्रमाणे 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही दिलात तर गृहलक्ष्मी गॅरंटीचे महालक्ष्मी गॅरंटीत रुपांतर करून आणखी पाच गॅरंटींची अंमलबजावणी करू, असे आश्वासन कारवार लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिले. त्या सोमवारी कुमठा येथे  प्रचारसभेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भाजपच्या 10 वर्षाच्या राजवटीत गरिबांच्या खात्यात 15 पैसेही जमा झालेले नाहीत. गरीब गरीबच बनून राहिले आहेत. शेतकऱ्यांचा कर्जाचा भार कमी झाला नाही. मला  लोकसभेवर पाठवले तर वनजमीन अतिक्रमण समस्येचा पहिल्याच अधिवेशनात आवाज उठविला जाईल, असे स्पष्ट करून निंबाळकर म्हणाल्या, गेली 30 वर्षे लोकसभेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी काँग्रेसला मिळाली नाही. त्यामुळे मतदारसंघाची अवस्था काय  आहे याची जाणीव सर्वांना आहे.  मतदारसंघातील प्रत्येक घरातून आपणाला आशीर्वाद मिळाला पाहिजे, असे आवाहन पुढे निंबाळकर यांनी केले.

Advertisement

हल्याळचे आमदार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे म्हणाले, मतदानाचे महत्त्व प्रत्येकाने ओळखले पाहिजे. प्रत्येक मत निंबाळकर यांना, काँग्रेसला दिले पाहिजे. देशातील सुशिक्षितांना रोजगार न मिळाल्याने बेरोजगार बनून राहण्याची परिस्थिती ओढवली आहे. राज्यात दुष्काळाने गंभीर स्वरुप धारण केले आहे. तरीसुद्धा केंद्र सरकारकडून राज्याला अनुदान मंजूर केले जात नाही. यावेळी कारवार जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य आणि कुमठाच्या माजी आमदार शारदा शेट्टी यांनी भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. के.पी.सी.सी. प्रधान कार्यदर्शी निवेदित अल्वा, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भुवन भागवत, हनुमंत पटगार आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article