For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेंडोलीत गवारेड्यांनी केले भातशेतीला लक्ष

03:09 PM Jun 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
तेंडोलीत गवारेड्यांनी केले भातशेतीला लक्ष
Advertisement

गवारेड्यांचा बंदोबस्त करा ; शेतकऱ्यांची मागणी 

Advertisement

वार्ताहर/ कुडाळ
आता भातलावणी हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांनी भातलावणी करण्यासाठी तरवा पेरला आहे. परंतु वन्यप्राणी मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवित आहेत. तेंडोली- भोमबागायत येथील परिसरात गवारेड्यानी अक्षरशः धुडगूस घातला आहे.गवारेड्याच्या कळपाने सध्या शेतकऱ्यांच्या भातशेतीला लक्ष केले आहे. तेथील शेतकरी राघोबा थोरबोले व शंकर थोरबोले यांनी लावणीसाठी पेरलेला चार- पाच किलोचा तरवा गवारेड्यांच्या कळपाने मंगळवारी रात्री फस्त केला. त्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहेत. वनविभागाने भात शेतीची पाहणी करून पंचनामे करून गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.