महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेतकऱ्यांनी उभारला ‘विनंती थांबा’ फलक

11:38 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शहापूर, वडगाव येथील शेतकरी बससेवेसाठी सक्रिय 

Advertisement

बेळगाव : वडगाव, शहापूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी धामणे, येळ्ळूर रस्त्याला लागून आहेत. त्या शेताकडे जाण्यासाठी महिला तसेच शेतकरी बसचा आधार घेत असतात. मात्र बस थांबविण्यास चालक टाळाटाळ करतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी या दोन्ही रस्त्यावर ‘बस थांबा विनंती’ फलक उभे केले आहेत. धामणे, येळ्ळूर, शहापूर, वडगाव परिसरातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी धामणे-येळ्ळूर मार्गावर विनंती बसथांबा उभारण्यात आला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी मागील आठवड्यात शेतकऱ्यांसाठी बस थांबावी यासाठी परिवहन विभागाला निवेदन सादर केले होते. शिवाय महिला शेतकऱ्यांनी बस अडवून आंदोलन छेडले होते. आता शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन धामणे-येळ्ळूर मार्गावर विनंती बस थांबा उभारला आहे. त्यामुळे परिवहनचे बसचालक या ठिकाणी बस थांबविणार का? हे पहावे लागेल.  यावेळी राजू मरवे, हणमंत बाळेकुंद्री, अनिल अनगोळकर, गोपाळ सोमण्णाचे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article