For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार विद्यार्थी असले तरीही शाळांचे पुनरुज्जीवन करणार

12:23 PM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार विद्यार्थी असले तरीही शाळांचे पुनरुज्जीवन करणार
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

Advertisement

पणजी : राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांचे पुनऊज्जीवन करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. एखाद्या शाळेत केवळ चार विद्यार्थी असले तरीही अशा शाळांचे पुनऊज्जीवन करण्यात येईल. राज्यात अनेक ठिकाणी खाजगी शाळा सुरू झाल्याचा परिणाम म्हणून सरकारी शाळांमधील पटसंख्येत घट झाली असून तेच मुख्य कारण असल्याचे सावंत म्हणाले. नुकत्याच बंद करण्यात आलेल्या 7 शाळांची पटसंख्या शून्य होती. त्यामुळे त्या बंद करण्यात आल्या. असे असले तरी अनेक शाळांमध्ये पटसंख्या काही प्रमाणात वाढलेलीही असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.