महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंडचा संघ अबुधाबीमध्ये विश्रांतीसाठी रवाना

06:22 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टीम इंडियातील खेळाडूही कुटुंबियासोबत : तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवली जाणार आहे. संपली. दुसऱ्या कसोटीनंतर तब्बल दहा दिवसांचा वेळ असल्याने इंग्लंडचा संघ रिफ्रेश होण्यासाठी यूएईला पोहोचला आहे. टीम इंडियातील खेळाडूही आपल्या कुटुंबियासोबत सुटीचा आनंद घेत आहेत. सततच्या क्रिकेटमुळे दोन्ही संघ आठवडाभर विश्रांती करणार असून दि. 12 रोजी सरावासाठी हे दोन्ही संघ राजकोटमध्ये दाखल होतील, असे सूत्रांनी सांगितले.

इंग्लंडचे खेळाडू मागील काही महिने सतत क्रिकेट खेळत आहेत. खेळाडूंना विश्रांती हवी आहे आणि क्रिकेटपासून दूर वेळ घालवायचा आहे. अशा परिस्थितीत सुटीचा आनंद लुटण्यासाठी इंग्लिश खेळाडू एकत्र येऊन अबुधाबीमध्ये गोल्फ खेळतील. यानंतर राजकोट कसोटीपूर्वी संघ भारतात परतेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीदरम्यान सुमारे 10 दिवसांचे अंतर असल्याने इंग्लंड संघ विश्रांती घेणार आहे. यादरम्यान, भारतीय संघातील खेळाडू देखील आपआपल्या घरी रवाना झाले आहेत. भारतीय खेळाडू तिसऱ्या कसोटीसाठी 12 फेब्रुवारीला राजकोटला पोहोचतील. इंग्लंडचे खेळाडूही पुढील सोमवारी परतणार असून राजकोटमध्ये सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्यांचे सराव सत्र होणार आहे. तिसऱ्या कसोटीसाठी अद्याप भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे उर्वरित कसोटीसाठी रविवारी संघनिवड होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article