For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमानतळापासून बसस्टँडपर्यंत उड्डाणपूल उभारण्याची मागणी

10:40 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
विमानतळापासून बसस्टँडपर्यंत उड्डाणपूल उभारण्याची मागणी
Advertisement

खासदार इराण्णा कडाडी यांनी मांडला प्रस्ताव

Advertisement

बेळगाव : जत-जांबोटी रस्त्याचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्ग करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गुरुवारी सांबरा विमानतळावर इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन सांबरा विमानतळापासून सिटी बसस्टँडपर्यंत उड्डाणपूल बांधावा. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. येळ्ळूर ते राजहंसगडापर्यंत अटल बिहारी वाजपेयी केबल कार योजनेला लवकरात लवकर सुरुवात करावी, संकेश्वरपासून नरगुंदपर्यंत (व्हाया हुक्केरी-गोकाक-यरगट्टी-मुनवळ्ळी मार्गे) राज्य महामार्गाचा दर्जा वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. या प्रस्तावांची पडताळणी करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.