महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनपा प्रवेशद्वारावरील पाण्याचा निचरा करण्याची मागणी

11:13 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच पाणी साचून राहात आहे. त्यामुळे तेथून ये-जा करणे अवघड जात आहे. मात्र या पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच ही परिस्थिती निर्माण झाल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. तेव्हा येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. तेव्हा याकडे महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article