इंदिरानगर-अनगोळ येथील गटारी साफ करण्याची मागणी
10:32 AM May 25, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : इंदिरानगर-अनगोळ येथील गटारी तुंबल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. तेंव्हा महानगरपालिकेने तातडीने या परिसरातील गटारी साफ कराव्यात, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या वळीव पावसामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून गटारीच साफ करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाणी निचरा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. गटारींमध्ये कचरा साचून आहे. याबाबत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गटारी साफ करण्यासाठी सूचना करण्यात आल्या. मात्र केवळ आश्वासना व्यक्तिरिक्त काहीच करण्यात आले नाही. तेंव्हा पावसाळ्यापूर्वी गटारी साफ कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article