महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कामाच्या ताणामुळे लखनौतही मृत्यू ?

06:08 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / लखनौ

Advertisement

एचडीएफसी बँकेच्या लखनौ शाखेत काम करणाऱ्या महिला कर्मचारी सदाफ फातिमा यांच्या काम करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कामाच्या अतिताणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. बँकेने याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पुणे येथेही एका महिलेचा असा काम करत असताना मृत्यू झाला होता. ती घटनाही कामाच्या अतिताणामुळे घडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याही प्रकरणाची सध्या चौकशी होत असून अद्याप अंतिम निष्कर्ष घोषित करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत हे दुसरे प्रकरण घडले आहे.

मंगळवारची घटना

मंगळवारी फातिमा या बँकेत काम करीत असताना अचानक खुर्चीतच कोसळल्या. त्या 45 वर्षांच्या होत्या. त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले. त्या बँकेत अतिरिक्त उप उपाध्यक्षदी कार्यरत होत्या. त्यांच्या शवविच्छेदनाचा आणि पंचनाम्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची चौकशी होत आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर स्थिती अधिक स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यादव यांची सरकारवर टीका

या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. देशात सध्या असणारे तणावाचे आर्थिक वातावरण हे या घटनेला जबाबदार आहे. सर्व कंपन्या आणि सरकारी विभागांनी अशी प्रकरणे गांभीर्याने घेतली पाहिजेत. अशा अचानक मृत्यूंमुळे काम करण्याच्या स्थितीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे वक्तव्य यादव यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article