महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कापसाच्या निर्यातीमध्ये झाली वाढ, दोन वर्षाच्या उच्चांकावर

06:48 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

लाल समुद्रात तणावाची स्थिती असतानाही भारताने कापसाच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे. दोन वर्षाच्या कालावधीत पाहता यंदाची निर्यात ही उच्चांकी मानली जात आहे. आशियातील प्रमुख खरेदीदारांनी चार लाख कापसाच्या पोत्यांची ऑर्डर भारताकडे केली आहे. जागतिक किमतींमध्ये झालेली वाढ यामुळे भारताला कापसाच्या निर्यातीमध्ये वाढ नोंदवता आली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये भारत 68 हजार मेट्रिक टन कापसाची निर्यात करण्याची तयारी करत आहे. चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांकडूनही कापसाची आयात केली जाते. जगामध्ये पाहता कापसाच्या निर्यातीमध्ये अमेरिका आणि ब्राझील या देशांचा वाटाही लक्षणीय असाच राहिला आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article