महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस केवळ इशाऱ्यावर चालणारा पक्ष

10:58 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगदीश शेट्टर यांचा हल्लाबोल : गोकाक येथे बैठक

Advertisement

बेळगाव : माजी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी व मी बेळगाव जिल्ह्यामध्ये गावागावात भाजप पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविली. शहरी भागात असणारा भाजप आज प्रत्येक गावोगावी पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास असल्यामुळेच त्यांना देशवासियांनी दोनदा संधी दिली आहे. तिसऱ्या वेळीही भरघोस मतांनी भाजपचेच सरकार सत्तेत येईल, असा ठाम विश्वास भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी रविवारी गोकाक येथे आयोजित बैठकीत व्यक्त केला. शेट्टर यांनी रविवारी गोकाक तालुक्याचा दौरा केला. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासोबत त्यांनी तालुक्याच्या विविध भागात कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेतल्या. प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस हा केवळ इशाऱ्यांवर चालणारा पक्ष आहे. परंतु, भाजप हा पक्ष ध्येयधोरणे घेऊन चालत असल्यामुळे जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयाला येत असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी जगदीश शेट्टर यांनी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे चाय पे चर्चा या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शनिवारी रात्री जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरविण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article