मिरची अन् ढब्बूही झाली तिखट
दोघांचेही दर शंभरावर आले, लसूण उतरली,प्रति लिंबू 8 ऊपयांवर
पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर वाढलेलेच आहेत. पणजी बाजारपेठेत सध्या मिरची आणि ढब्बूने शतक गाठले असून, 100 ऊपये प्रतिकिलोच्या दरात या दोन्ही भाज्या विकल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून आले व लसूणचे भावही गगनाला भिडले होते. त्याचे भाव आता पणजी बाजारपेठेत उतरले असून आले 120 ऊपये प्रतिकिलो तर लसूण 280 ऊपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. राज्यभरात गेल्या आठवड्यापासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. या पाश्वभूमीवर राज्यात लिंबू सरबत, लिंबू सोडाचे सेवन नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. परिणामी पणजी बाजारपेठेत प्रति लिंबू 8 ऊपयांमध्ये विकला जात आहे. या अगोदर 20 ऊपयांना 5 ते 6 लिंबू विकले जात होते. तसेच फलोत्पादन महामंडळाच्या दुकानावर प्रति लिंबू 5 ऊपये विकला जात आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत पणजी बाजारपेठेत काही भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे, तर काही भाज्यांचे दर उतरले आहेत. कांद्याचे दर स्थिर असून, 30 ऊपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. टोमॅटो 10 ऊपयांनी स्वस्त झाला असून, सद्या 40 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. बटाटेसुद्धा 40 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. इतर भाज्यांचे दर बघण्यास गेलो तर मटार, भेंडी आणि वालपापडी 80 ऊपये प्रतिकिलोच्या दरात विकल्या जात आहे. गाजर, चिटकी आणि बीट 60 ऊपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. वाढलेल्या गरमीमुळे पणजी बाजारपेठेत शहाळ्यांना चांगली मागणी असून, 50 ऊपये प्रति शहाळे विकले जात आहे. तसेच कैऱ्या पणजी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असून, 100 ऊपयांना 4 ते 5 कैऱ्या विकल्या जात आहेत. पणजी बाजारपेठेत या भाज्यांचे दर वाढलेले असले तरी फलोत्पादन महामंडळांच्या दुकानावर कमी दरात भाज्या उपलब्ध आहेत.