For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जातनिहाय जनगणना ही केंद्राची ‘अक्षय तृतीया’ भेट

01:16 PM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
जातनिहाय जनगणना ही केंद्राची ‘अक्षय तृतीया’ भेट
Advertisement

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईककडून स्वागत

Advertisement

पणजी : लवकरच आरंभ होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेतच जातनिहाय जनगणनाही करण्याची केंद्र सरकारने केलेली घोषणा ही ‘अक्षय तृतीया’ भेट आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. बुधवारी पणजीत पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांचीही उपस्थिती होती. देशभरातील विविध मागासवर्गीय संघटना तसेच असंख्य राज्य सरकारांकडूनही सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी होत होती. केंद्र सरकारच्या वरील घोषणेमुळे ती मागणी आता पूर्णत्वास येणार आहे, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला व या निर्णयामुळे सामाजिक आणि आर्थिक धोरणे अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

प्रत्यक्षात दरवेळी होणाऱ्या जनगणनेदरम्यान प्रत्येकाची जात, लिंग यांची नोंद होतच होती. मात्र यंदाच्या जनगणनेवेळी त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. ही माहिती खास करून आरक्षण धोरणाचा फेरविचार, तसेच आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी योजनांची आखणी आणि धोरणनिर्मिती  यासाठी अत्यावश्यक ठरेल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला आहे. गोव्यात गेल्या काही वर्षांपासून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भंडारी समाजासह अन्य मागासवर्गीय समाज घटकांकडूनही जातनिहाय जनगणनेची मागणी होत होती. मात्र अशी जनगणना सरकारी पातळीवर होऊ शकत नसल्याचे सांगत सरकारकडून त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे कठोर निर्णय घेताना गत आठवड्यातच भंडारी समाजाने स्वत:च जनगणना करण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांची जनगणना प्रारंभ होण्यापूर्वीच केंद्राचा महत्वपूर्ण जाहीर झाला असून त्यामुळे आता या समाजातील नेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरेल असा आशावाद दामू नाईक यांनी व्यक्त केला.

Advertisement

राज्य, केंद्र सरकारचे अभिनंदन-आभार : देवानंद नाईक 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गोमंतक भंडारी समाज केंद्र सरकारचे स्वागत व अभिनंदन करत आहे. जातनिहाय जनगणना व्हावी, अशी भंडारी समाजाची मागणी होती. काही दिवसांपूर्वी आम्ही समाजाचे पदाधिकारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी मांडून ती केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली होती. त्यांनी आमच्या मागणीचा केंद्र सरकारशी पाठपुरावा केल्यामुळे आमची मागणी मान्य झाली. मुख्यमंत्री डॉ. सावंत, भाजपाध्यक्ष दामू नाईक यांचे अभिनंदन करुन त्यांना धन्यवाद देत आहोत, असे गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद अर्जुन नाईक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.