महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

7 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 71 हजार कोटीहून अधिक वाढ

06:35 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारती एअरटेल आघाडीवर : सेन्सेक्स 374 अंकांनी होता वाढला

Advertisement

वृत्तसंस्था/  मुंबई

Advertisement

आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 71 हजार कोटीहून अधिक रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

मागच्या आठवड्यामध्ये चारच दिवस शेअर बाजाराचे कामकाज झाले असून बीएसई सेन्सेक्स 374 अंकांनी वाढला होता. 8 मार्च रोजी शेअर बाजाराला शिवरात्रीनिमित्त सुट्टी होती. आघाडीवरच्या सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 71 हजार 301 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये भारती एअरटेल या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढले असल्याचीही बाब समोर आली आहे.

यासोबतच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांच्या भांडवल मूल्यामध्येसुद्धा वाढ झाली आहे. दुसरीकडे दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एलआयसी यांच्या भांडवल मूल्यामध्ये मात्र मागच्या आठवड्यामध्ये घसरणझाल्याचे पाहायला मिळाले.

कुणाचे किती भांडवल वाढले

भारती एअरटेलच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 38 हजार 726 कोटी रुपयांची वाढ होऊन कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 6 लाख 77 हजार 448 कोटी रुपयांवर पोहोचले होते. एसबीआयचे बाजार भांडवल मूल्य 13,476 कोटी रुपयांनी वाढून 7 लाख 3 हजार 393 कोटी रुपयांवर पोहोचले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article