आचरा येथून बोरीवली बस फेरीचा शुभारंभ
आचरा पंचक्रोशीतील प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
आचरा प्रतिनिधी
आचरा कणकवली बोरीवली बस फेरीचा शुभारंभ आचरा तिठा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख महेश राणे, उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर,चावल मुजावर, पंकज आचरेकर, अभय भोसले, उदय घाडी, वाहतूक निरीक्षक प्रदिप परब, आचरा कंट्रोलर अनाजी गावडे,बोरीवली बस फेरीचे चालक सुनील तारी, वाहक कृष्णा तळाशीलकर, यांसह अन्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.पुर्वी सुरु असलेली आचरा बोरीवली कणकवली गाडी बंद झाल्याने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता यासाठी आचरा बोरीवली बस हि गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी निवेदनाद्वारे मालवण आगार प्रमुखांकडे केली होती. एसटी प्रशासनाने याची दखल घेत गुरुवार पासून बोरीवली साठी आरामदायी बस सुरु केली . यामुळे मुंबई कडे जाणारया प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सदर बस आचरा तिठा येथून दुपारी तीन वाजता सुटणार आहे. तसेच बोरीवली येथून गावी येणारया प्रवाशांसाठी दुपारी तीन वाजता निघणार आहे. या गाडीचा लाभ मुंबई ला जाणारया प्रवाशांनी घेण्याचे आवाहन सरपंच जेरान फर्नांडिस यांनी केले आहे.