महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शाश्वत विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : तानावडे

11:02 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा शाश्वत विकासाला चालना देणारा असून त्याद्वारे उत्पादनात वाढ आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत होईल, असे प्रतिपादन खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले आहे. शनिवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे. त्यातून विकसित भारत संकल्पनेस चालना मिळेल व देशातील प्रत्येक नागरिकास लाभदायक ठरेल, असे ते पुढे म्हणाले. अशा आदर्श अर्थसंकल्पासाठी देश पंतप्रधानांचा आभारी राहील, असे तानावडे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article