‘बीपीसीएल’ला पहिल्या तिमाहीत 3,962 कोटींचा तोटा
वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा परिणाम :मात्र महसूलात 23 टक्क्यांच्या वाढीची नेंद
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत पेट्रोलियमने (बीपीसीएल) 22 जुलै रोजी संपलेल्या जून तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीला 3,962 कोटींचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 6,124 कोटींचा नफा झाला होता. त्याच वेळी, मार्च तिमाहीत 3,191 कोटींचा नफा झाला होता. कार्यवाहीतून मिळणारा महसूल 23 टक्क्यांनी वाढून तो 1.59 लाख कोटींवर पोहोचला. मात्र बीपीसीएलचा महसूल 1.59 लाख कोटींवर पोहोचला आहे. हा गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 23 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तेव्हा कंपनीचा महसूल 1.29 लाख कोटी होता. तिमाही-दर-तिमाही आधारावर, मार्च तिमाहीतील 1.35 लाख कोटींच्या तुलनेत महसुलात 18 टक्क्यांची वाढ झाली आहे.
तुटीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ. भारत पेट्रोलियमचे शेअर्स वर्षभर स्थिर राहिले. भारत पेट्रोलियमचे शेअर्स आज 3 टक्क्यांनी घसरून 309 रुपयांवर बंद झाले. यावर्षी म्हणजेच 1 जानेवारीपासून आतापर्यंत त्यात 19 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत 12टक्क्यांनी आणि एका वर्षात 9 टक्के इतक्या अंकांनी घसरण झाली आहे. भारत पेट्रोलियमचे मुंबई, कोची, नुमालीगड आणि बिना येथे तिचे रिफायनरी कार्यरत आहेत. त्यांची एकत्रित शुद्धीकरण क्षमता प्रतिवर्षी 40 दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. बीपीसीएल इंधन, वंगण आणि द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) यांसारख्या विविध पेट्रोलियम उत्पादनांचे वितरण देखील करते.