For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

05:38 PM Jan 22, 2025 IST | Pooja Marathe
राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Advertisement

दहावी, बारावी परीक्षा केंद्रावर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट

Advertisement

मुंबई
दहावी आणि बारावीच्या परिक्षा केंद्रावर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची लगबग सुरू असते. यावेळी परिक्षा केंद्रावर मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या परिक्षा केंद्रावर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या परीक्षा केंद्रावर त्याच शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाही. तर इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असा आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळांना दिला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपमत्र आणि शालान्त माध्यमिक प्रमाणपत्र या दोन्ही परिक्षांना सुमारे ३१ लाख विद्यार्थी बसले आहेत. तसेच परिक्षापूर्व कालावधीत केंद्रावर कोणताही, गैरप्रकार होणार नाही, परिक्षा निर्धारित कालावधीत सुरू होईल याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.