कठुआत दहशतवाद्यांना लष्कराचे चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक झाली. यादरम्यान भारतीय लष्करी जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. येथे काही दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. गेल्या 72 तासात म्हणजेच तीन दिवसात तीन ठिकाणी चकमकी झाल्या असून त्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर, सुरक्षा दलाच्या दोन जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसात घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. कठुआ जिह्यातील बानी भागात रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. त्यानंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची शक्मयता असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरात दोन ते तीन दहशतवादी असण्याची शक्मयता आहे. दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आहे. नाकाबंदी मजबूत केली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.