आनंद अकादमी अंतिम फेरीत
टायगर चषक निमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : पँथर क्रिकेट क्लब बेंगळूर स्पोर्ट्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या टायगर चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून आनंद अकादमीने हिरसन बेंगळूर संघाचा 2 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. भुतरामहट्टी येथील भगवान महावीर मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 8 गडी बाद 145 धावा केल्या. त्यात श्रेयश पाटीलने 4 चौकारासह 27, स्वराज्य गोवेकरने 2 चौकारासह 25, अरुश जंगीने 16 धावा केल्या. बेंगळूरतर्फे शशांक आर. व अमय प्रभू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हेर्सन बेंगळूरने 30 षटकात 8 गडी बाद 143 धावा केल्या. छायांक रेड्डीने 42 तर अमय प्रभूने नाबाद 25 धावा केल्या. आनंदतर्फे आरुश जंगीने 3 गडी बाद केले. अंतिम सामना सीबीटी बेंगळूर विरुद्ध आनंद क्रिकेट अकादमी यांच्यात खेळविण्यात येणार आहे. सामन्यानंतर बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.