‘एअर इंडिया’चे एमडी आलोक सिंग यांचा राजीनामा
पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण : 19 मार्च रोजी कार्यकाळ पूर्ण
मुंबई :
टाटा ग्रुपची कमी किमतीची विमान कंपनी एअर इंडिया एक्सप्रेस (एआयएक्स) मध्ये मोठे बदल होत आहेत. 19 मार्च रोजी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर एअरलाइनचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आलोक सिंग हे पद सोडतील. सोमवारी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.
आलोक सिंग यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडिया एक्सप्रेसने एअरएशिया इंडिया (आता एआयएक्स कनेक्ट) सोबत विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या जाण्याने, टाटा ग्रुपच्या मालकीच्या या विमान कंपनीला उच्च स्तरावर नेतृत्वातही बदल दिसून येईल.
19 मार्च 2023 रोजी झाले एमडी
9 नोव्हेंबर 2020 रोजी आलोक सिंग तत्कालीन सरकारी मालकीच्या एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ झाले. जानेवारी 2022 मध्ये टाटा ग्रुपने एअर इंडियाचे अधिग्रहण केले तेव्हा सिंग यांनाही त्यांची सूत्रे सोपवण्यात आली. त्यानंतर 19 मार्च 2023 रोजी त्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी एमडी म्हणून नियुक्त करण्यात आले. आता त्यांचा कार्यकाळ 19 मार्च रोजी संपत आहे.
कार्यकाळातील कामगिरी...
?विमानांची संख्या : एअरलाइनकडे आता 100 हून अधिक विमानांचा ताफा आहे.
?नेटवर्क: भारतासह या विमान कंपनीची पोहोच या प्रदेशातील 14 देशांमध्ये आहे.
?कर्मचारी: सध्या कंपनीत 8,300 कर्मचारी काम करत आहेत.
?विलीनीकरण: 1 ऑक्टोबर 2024 रोजी एआयएक्स कनेक्टचे एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये यशस्वीरित्या विलीनीकरण झाले.