For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीनंतरच ‘त्या’ बेकायदेशीर इमारतींवर कारवाई

06:55 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीनंतरच ‘त्या’ बेकायदेशीर इमारतींवर कारवाई
Advertisement

बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या 5 इमारतींचा सर्व्हे पूर्ण

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बेकायदेशीर इमारतींना कलम 321 नुसार नोटीस देण्यात येणार आहे. शहरामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीर इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली आहे. संबंधित इमारतींचा संपूर्ण सर्व्हे करण्यात आला असून त्या इमारत मालकांना नोटिसा दिल्या जाणार असल्याची माहिती मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून देण्यात आली आहे.

Advertisement

सध्या निवडणुकीचे काम सुरू असल्यामुळे बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या इमारतींकडे दुर्लक्ष झाले आहे. जवळपास 5 इमारतींचा पूर्ण सर्व्हे करण्यात आला आहे. इमारती बांधताना त्या मालकांनी नियमानुसार बांधकाम केले नाही. काही ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नगरसेवकांनी त्याविरोधात स्थायी समितीच्या बैठकीत तक्रार केली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी आता सर्व्हे पूर्ण केला आहे. महानगरपालिकेकडून परवानगी घेतल्यानंतर सर्वच नियमांचे उल्लंघन या इमारत मालकांनी केले आहे. परिणामी ही कारवाई करण्यात येणार आहे.

सध्या पाच इमारतींच्या मालकांना थेट कलम 321 नुसार नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे संबंधितांना आयुक्तांसमोर हजर राहून त्याला उत्तर द्यावे लागणार आहे. यापूर्वी केवळ नोटीस देऊन संबंधितांना समज दिली होती. मात्र आता त्या इमारतींच्या बेकायदेशीर कामांबाबत कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन झाले तर थेट अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे, असे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.