आचार्य यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ
06:22 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गुवाहाटी :
Advertisement
संघ आणि भाजपचे नेते राहिलेले लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी मंगळवारी आसामचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे. आचार्य यांनी गुलाबचंद कटारिया यांचे स्थान घेतले आहे. कटारिया हे आता पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणून नियुक्त झाले आहेत. गुवाहाटी उछच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय बिश्नोई यानी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा आणि अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी पदाची शपथ दिली. आचार्य यांना मणिपूरचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement