For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुलाची शिरोलीत दोन हजार रेशनकार्ड धारक अन्नधान्य लाभापासून वंचित

07:57 PM Dec 01, 2023 IST | Kalyani Amanagi
पुलाची शिरोलीत दोन हजार रेशनकार्ड धारक अन्नधान्य लाभापासून वंचित
Advertisement

पुलाची शिरोली प्रतिनिधी

Advertisement

बंद केलेले रेशनकार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी गावातील कांही दुकानदारांनी प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे वसुल करण्याची मोहीम उघडली आहे. यासाठी तालुक्यातील एका अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न ४४ हजार रुपये व शहरी भागातील कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न ५४ हजार पेक्षा जास्त आहे अशी सर्व रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्यांचा पुरवठा बंद केला आहे. या नियमानुसार पुलाची शिरोलीत सुमारे दोन हजार रेशनकार्ड धारक कुटुंबे अन्नधान्य लाभापासून वंचित आहेत. ही सरासरी आकडेवारी ग्रामीण भागातील २५ टक्के व शहरी भागातील ४५ टक्के इतकी आहे. ही बंद रेशनकार्ड सुरू करून देण्यासाठी माळवाडी कोरगावकर काँलनी व छत्रपती शिवाजी नगर येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी पैसे गोळा करण्याचे दुकानच उघडले आहे. हे दूकानदार लाभार्थी असलेल्या लोकांना धान्य देताना चालढकल करीत आहेत. पण बंद पडलेल्या कार्ड धारकांना भेटून पैसे गोळा करण्यात अधिक व्यस्त आहेत. याची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घ्यावी. व ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय द्यावा.व संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होवू लागली आहे.

योजनेत मोफत नावे समाविष्ट केली जातील !

Advertisement

ग्रामसभेचा ठराव व उत्पन्नाचा दाखला ह्या निकषाच्या आधारे प्राधान्य योजनेत नावे मोफत समाविष्ट केली जातात. यासाठी स्वस्त धान्य दुकानदार , एजंट अथवा मध्यस्थ यांनी पैशाची मागणी केल्यास देवु नयेत. तसेच त्यांच्या विरुद्ध तात्काळ तक्रार दाखल करावी. संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल.असे तहसिल कार्यालयाचे पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे म्हणाले आहेत.

Advertisement
Tags :

.