महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनिवासी भारतीयांनी 9.28 लाख कोटी मायदेशी पाठविले

07:00 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2022 मधील आयओएमची आकडेवारी : 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जादा रक्कम पाठवणारा भारत ठरला पहिला देश

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली 

Advertisement

वर्ष 2022 मध्ये, अनिवासी भारतीयांनी 111.22 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 9.28 लाख कोटी रुपये मायदेशी पाठवले आहेत. यासोबतच 100 अब्ज डॉलर्स (8.34 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा भारत हा पहिला देश बनला आहे, अशी माहिती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (आयओएम) च्या 2024 च्या अहवालात देण्यात आली आहे. आयओएमच्या या यादीत मेक्सिको दुसऱ्या स्थानावर आहे, जो 2021 मध्ये देखील दुसरा सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश राहिला होता. 2021 मध्ये मेक्सिकोने चीनला मागे टाकत हे स्थान मिळवले. मेक्सिकोला 2022 मध्ये 5.1 लाख कोटी रुपये पाठवले गेले आहेत. चीन तिसऱ्या क्रमांकावर, फिलिपाइन्स चौथ्या क्रमांकावर आणि फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे.

पहिल्या 10 मध्ये दक्षिण आशियातील तीन देश

यापूर्वी, 2010 मध्ये 53.48 अब्ज डॉलर, 2015 मध्ये 68.91 अब्ज आणि 2020 मध्ये 83.15 अब्ज डॉलर रेमिटन्स प्राप्त करणारा भारत अव्वल देश होता. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 च्या यादीत दक्षिण आशियातील तीन देश आहेत.  भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे पहिल्या 10 रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहेत, जे या कामगार स्थलांतरावर प्रकाश टाकतात. आखाती देश हे स्थलांतरित कामगारांसाठी मुख्य ठिकाण आहेत.आखाती देश स्थलांतरित कामगारांसाठी एक प्रमुख स्थान आहे. विशेषत: भारत, बांगलादेश, इजिप्त, इथिओपिया, केनिया येथील कामगार आखाती देशात जात आहेत, जिथे ते उत्पादन, आदरातिथ्य, सुरक्षा आणि इतर क्षेत्रांमध्ये घरगुती काम करतात. भारतातून जगात सर्वाधिक स्थलांतरित कामगार जातात. यासोबतच संयुक्त अरब अमिराती, अमेरिका आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी राहतात.

कोरोनात भारतीय असुरक्षित

अहवालात असे म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात मोठ्या संख्येने भारतीय स्थलांतरित पगार न देणे, सामाजिक सुरक्षा कमी करणे आणि नोकऱ्या गमावणे यामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज आणि असुरक्षिततेत होते. अहवालात तज्ञांचा हवाला देत असे म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे देशातील कामगारांच्या स्थलांतरण पद्धतीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात कामाची पद्धत बदलली असल्याचे दिसून आले आहे.

रेमिटन्स म्हणजे काय?

जेव्हा एखादा स्थलांतरित त्याच्या मूळ देशात पैसे पाठवतो तेव्हा त्याला रेमिटन्स म्हणतात. हे परकीय चलन मिळवण्याचे साधन आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी रेमिटन्स हा घरगुती उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. भारताकडे पाठवलेल्या रकमेच्या बाबतीत आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांचे योगदान जास्त आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या विकसित देशांतूनही रेमिटन्स भारतात येतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article