महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहाव्या टप्प्यात 63.37 टक्के मतदान

06:33 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निवडणूक आयोगाने जारी केला आकडा : पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मंगळवारी जारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानुसार सहाव्या टप्प्यात एकूण 63.37 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यात 61.95 टक्के पुरुष आणि 64.95 टक्के महिला आणि 18.67 टक्के तृतीयपंथीय मतदारांनी स्वत:च्या मताधिकाराचा वापर केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यात 11.13 कोटी पात्र मतदारांपैकी 7.05 कोटी मतदारांनी स्वत:चा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 6 टप्प्यांमध्ये 87.54 कोटी मतदारांपैकी 57.77 कोटी मतदार हे मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. भारतात जगातील सर्वात मोठा मतदारवर्ग असून ही संख्या 96.88 कोटी इतकी आहे.

आयोगानुसार 20 मे रोजी झालेल्या पाचव्या टप्प्यामध्ये 62.2 टक्के मतदान झाले होते. चौथ्या टप्प्यात 69.16 टक्के मतदानाची नोंद झाली. तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा आकडा 65.68 टक्के राहिला. तर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 66.71 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के मतदानाची नोंद झाली.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 58 जागांवर मतदान झाले. यात जम्मू-काश्मीरचा अनंतनाग-राजौरी मतदारसंघ सामील होता, येथील मतदान तिसऱ्या टप्प्याऐवजी सहाव्या टप्प्यात पार पडले होते. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी, निरहुआ, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि मनोहरलाल खट्टर समवेत अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भवितव्याचा निर्णय याच टप्प्यात ईव्हीएमध्ये कैद झाला होता.

सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेशातील 14, हरियाणातील सर्व 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, दिल्लीच्या सर्व 7, ओडिशातील 6 आणि झारखंडच्या 4 जागांवर मतदान झाले. तर जम्मू-काश्मीरमधील एका मतदारसंघातही मतदान पार पडले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article