विदेशी गुंतवणूकदारांनी काढले 6 हजार कोटी
06:28 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
बाजारातून एप्रिल मध्ये आतापर्यंत 6 हजार 300 कोटी रुपयांची उचल केली आहे. अमेरिकेतील बॉण्ड यिल्डमध्ये झालेली वाढ, मॉरिशसचा करसंदर्भातील मुद्दा यामुळे गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यावरती भर दिला होता. मार्च महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 35 हजार 98 कोटी रुपयांची भरभक्कम गुंतवणूक बाजारात केली होती. या आधीच्या फेब्रुवारी महिन्यात 1539 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. 26 एप्रिलपर्यंत विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 6 हजार 304 कोटी रुपयांची उचल भारतीय शेअर बाजारातून केली आहे. विविध मुद्यांच्या कारणास्तव विदेशी गुंतवणूकदार सावध झाले असल्याचे एकंदर परिस्थितीवरून दिसून आले आहे. अमेरिकेतील एकंदर महागाईची स्थिती, जागतिक स्तरावरील अशांतता ही कारणे देखील त्यामागे आहेत.
Advertisement
Advertisement