For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत 6 ठार

07:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत 6 ठार
Advertisement

मृतांमध्ये बरेलीतील आई-मुलीचा समावेश : गंगोत्रीला जात असताना डोंगराळ भागातील दरीत कोसळले

Advertisement

वृत्तसंस्था/उत्तरकाशी, बरेली.

चारधाम यात्रेदरम्यान उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे गुरुवारी हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बरेली येथील आई-मुलीचा समावेश आहे. उत्तरकाशीतील गंगनी येथील भागीरथी नदीजवळ हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड हे अपघाताचे कारण मानले जात आहे, परंतु सविस्तर तपास अहवाल आल्यानंतरच नेमकी कारणे कळतील. नागरी उ•ाण मंत्रालयाने अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

गंगोत्री आणि यमुनोत्री दरम्यान चारधाम भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या अपघातात बरेली येथील केमिकल इंजिनिअर असलेली तरुणी आणि तिच्या आईसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी गंगोत्रीहून यमुनोत्रीकडे उ•ाण करत असताना हा अपघात झाला. उ•ाण केल्यानंतर काही मिनिटांतच वैमानिकाला तांत्रिक बिघाड लक्षात आला आणि हेलिकॉप्टरचे नियंत्रण सुटले. अत्यंत दुर्गम डोंगराळ भागात कोसळलेल्या या हेलिकॉप्टरमधील कोणीही वाचू शकले नाही.

अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्ती निवारण दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातात जीव गमावलेली वृद्ध महिला राधा अग्रवाल बरेलीतील आलमगिरीगंज येथील पटवारी मंदिराजवळ राहत होती. पतीच्या निधनानंतर ती गेल्या दोन वर्षांपासून आपली मुलगी रुची अग्रवालसोबत मुंबईत राहत होती. रुची मुंबईत केमिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधील भाविकांची ओळख पटविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न हाती घेण्यात आले. ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली आहे.

चारधाम यात्रेत यापूर्वीही अपघात, दक्षतेचे आदेश

दरवर्षी लाखो भाविक उत्तराखंडच्या चारधाम यात्रेत सहभागी होतात. असे असूनही गेल्या काही वर्षांत हेलिकॉप्टर सेवांशी संबंधित अपघातांमध्ये वाढ झाली आहे. याआधीही अशा अनेक घटना घडल्यामुळे यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक प्रशासनाने यात्रेकरूंना प्रवासादरम्यान हवामान आणि तांत्रिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद परिस्थिती आढळल्यास जवळच्या प्रशासकीय युनिटला त्वरित कळवण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.