महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

4 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 2.18 लाख कोटींनी वाढ

06:36 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एलआयसी, एसबीआय आघाडीवर, इन्फोसिस, आयटीसीच्या भांडवलात घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

दहापैकी चार कंपन्यांचे बाजारमूल्य 2.18 लाख कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. मागच्या आठवड्यामध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली असल्याची असल्याचे दिसून आले आहे.

आघाडीवरच्या दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्&िव्हसेस, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि एसबीआय या कंपन्यांचे बाजार भांडवल वाढले होते. या उपरोक्त कंपन्यांनी संयुक्तपणे बाजार भांडवलामध्ये दोन लाख 18 हजार 598 कोटी रुपयांची भर घातली होती. दुसरीकडे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांच्या बाजार भांडवलामध्ये घसरणीची नोंद करण्यात आली. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स 490 अंकांनी घसरणीत राहिला होता. एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 86,146 कोटी रुपयांनी वाढून 6,83,637 कोटी रुपयांवर पोहोचले होते. एसबीआयच्या बाजार भांडवलामध्ये 65 हजार 908 कोटी रुपयांची भर पडली असून ते 6 लाख 46 हजार 365 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. टीसीएसच्या बाजार भांडवलामध्ये 61 हजार 435 कोटी रुपयांची भर पडली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 5108 कोटी रुपयांनी वाढून 19 लाख 77 हजार 136 कोटी रुपयांवर पोहोचले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article