महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

3 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1 लाख कोटींनी वाढ

06:23 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एचडीएफसी बँकेचे मूल्य वाढले तर रिलायन्सचे घटले

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आघाडीवरच्या 10 पैकी 3 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात 1.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या भांडवलात अधिक वाढ झाली आहे.

मागच्या आठवड्यात 3 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 1 लाख 06 हजार 125 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात सोमवारी शेअरबाजाराला बकरी ईदची सुट्ट्ाr होती. त्यामुळे चारच दिवस बाजारात काम झाले होते, या दरम्यान बीएसई सेन्सेक्स 217 अंकांनी किंवा 0.28 टक्के इतका वाढला होता. सदरच्या आठवड्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांच्या भांडवलात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी यांच्या बाजार भांडवल मूल्यात घसरण झालेली होती. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 52 हजार 91 कोटी रुपयांनी घटत 12 लाख 67 हजार 056 कोटी रुपयांवर राहिले होते. तर आयसीआयसीआय बँकेचे भांडवल मूल्य 36 हजार 118 कोटी रुपयांनी वाढत 8 लाख 13 हजार 914 कोटी रुपयांवर आले होते. इन्फोसिसच्या मूल्यात 17 हजार 915 कोटींची भर पडत मूल्य 6 लाख 35 हजार 945 कोटी रुपयांवर आले आहे.

यांचे मूल्य घसरले

रिलायन्स इंडस्ट्रिजचे मूल्य 32 हजार 271 कोटी रुपयांनी कमी होत 19 लाख 66 हजार 686 कोटी रुपयांवर खाली आले. एलआयसीचे भांडवल मूल्य 27,260 कोटींनी घटत 6,47,616 कोटी रुपयांवर खाली आले होते.

12,170 कोटीची विदेशी गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारात जूनमध्ये आतापर्यंत विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी 12,170 कोटी रुपयांची इक्विटी समभागात गुंतवणूक केली आहे.  लोकसभा निवडणुकीत भाजपचे रालोआ सरकार सत्तेवर आले असून याबाबत विश्वास वाढला असून विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचा क्रम सुरु ठेवला आहे. मे मध्ये बाजारातून 25,586 कोटी रुपये काढले होते. सध्याला तरी गुंतवणूक वाढते आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article