For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंबाबाई, जोतिबा मंदिरासाठी दोन हजार कोटी मंजूर

11:24 AM May 08, 2025 IST | Radhika Patil
अंबाबाई  जोतिबा मंदिरासाठी दोन हजार कोटी मंजूर
Advertisement

कोल्हापूर / विनोद सावंत : 

Advertisement

अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी सुमारे दोन हजार कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. ही चांगलीबाब आहे. परंतू प्रत्यक्षात याच्या अंमलबजावणीचे आव्हान असणार आहे. सध्याची राज्यशासनाची आर्थिक स्थिती पाहता पहिल्या टप्प्यात नेमका निधी किती आणि कधी मिळणार आहे. सुमारे 20 टक्के स्थानिक व्यापारी, रहिवाशींचा भूसंपादनाला अद्यपी नकार असून त्यांचे मने वळवताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. याचबरोबर कामे दर्जदार आणि वेळेत होण्यासाठी संबंधित प्रशासकीय कार्यालयामध्ये समन्वय ठेवावा लागणार आहे.

 कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी अनुक्रमे 1445 कोटी 97 लाख व 259 कोटी 59 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली. कोल्हापूरच्या पर्यटन आणि विकासासाठी हा निर्णय महत्वपूर्ण आहे. सध्या अंबाबाई मंदिर परिसरात अतिक्रमणामुळे तसेच पार्कींग व्यवस्था नसल्याने वाहतुक कोंडी होते. दर्शन मंडपसह अन्य सुविधा नसल्याने भाविकांची गैरसोय होते. या आराखड्यानुसार कामे झाल्यास सर्व प्रश्न निकाली निघणार असले तरी या कामात अद्यपी अडथळ्यांची शर्यत आहे. मंजूर निधी नेमका जिल्हा प्रशासनाकडे कधी वर्ग होणार आहे. विशेष म्हणजे मंजूर निधी एकाच वेळी की टप्प्या टप्प्याने मिळणार याबाबत स्पष्टता नाही. तसेच 300 दुकाने, 170 मिळकतींचे भुसंपादन करावे लागणार असून 100 टक्के हा प्रश्न सुटलेला नाही. मंदिर परिसरातील फेरीवाल्यांचाही प्रश्न आहे. हे सर्व अडथळे पार करताना प्रशासनाची कसरत होणार आहे. मिळालेल्या निधीतून होणारी कामे जलद गतीने आणि दर्जदार होण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, देवस्थान समिती, सार्वजाणिक बांधकाम विभाग, पुरातत्व विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.

Advertisement

  • देवस्थान समिती अध्यक्ष नियुक्ती तत्काळ करण्याची गरज

जोतिबा आणि अंबाबाई मंदिराची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे आहे. 2019 पासून देवस्थान समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. 1445 कोटींच्या कामांमध्ये थेट समितीचा सहभाग नसला तरी आराखड्यानुसार पहिल्या टप्यात मंदिर संवर्धनाची कामे होणार आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे जिल्ह्यातील इतरही कामाची जबाबदारी आहे. त्यांना येथील कामावर सतत लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे येथील कामावर वॉच ठेवण्यासाठी देवस्थान समिती अध्यक्ष नियुक्त तत्काळ होणे असणे आवश्यक आहे.

  • जोतिबा मंदिराच्या उर्वरीत निधीचे काय?

जोतिबा मंदिर परिसराचा 1600 कोटींचा विकास आराखडा आहे. त्यापैकी 259 कोटीतील पहिल्या टप्प्यातील कामांना मंगळवारी मंत्रीमंडळात मंजूरी मिळाली आहे, उर्वरीत कामांच्या निधीला मंजूर केव्हा मिळणार हे अस्पष्ट आहे.

  • तीर्थक्षेत्र’ आराखड्याप्रमाणे स्थिती नको

तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युती सरकार असताना 2100 कोटींच्या अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रस्तावित केला होता. यामध्ये भुसंपादन वगळून पहिल्या टप्प्यात 210 कोटींची कामे करण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यात केवळ 9 कोटींचा निधी मिळाला. सरस्वती टॉकीज येथे या निधीतून होत असणारे बहुमजली पार्कीगचे काम अद्यपी अपूर्ण आहे. पाच वर्षानंतर आणखीन 40 कोटींचा निधी मिळाला असला तरी यातून भक्त निवासाच्या होणाऱ्या कामाला अद्यपी मुहूर्त नाही. अशी स्थिती पुनर्विकास आराखड्याची होवू नये, अशी प्रतिक्रिया भाविकांना येत आहे.

  • स्थानिकांची मत परिवर्तन होण्यापूर्वीच काम सुरू व्हावी

तत्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बहुतांशी स्थानिक रहिवाशी, व्यापारींची भुसंपादनासाठी मानसिक्ता केली होती. आता निधी मंजूर झाला आहे. यामधील रहिवाशी, व्यापाऱ्यांची मत परिवर्तन होण्यापूर्वी याची 1445 कोटींच्या आराखड्याची अंमलबजावणी त्वरीत होणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.